पाकिस्तानकडून प्रत्युत्तराची धमकी   

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तराची धमकी दिली आहे. तसेच, जशास-तसे उत्तर देण्याचे अधिकार पाकिस्तानने लष्कराला दिले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सुरक्षा समितीची (एनएससी) बैठक पार पडली. या बैठकीत शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराला हे अधिकार दिले. देशाच्या स्वसंरक्षणार्थ पाकिस्तानी लष्कराला त्यांच्या आवडीची वेळ, ठिकाण आणि कोणत्याही पद्धतीने भारताच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे, असे पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानला स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असे सांगताना भारतावर पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप केला.

Related Articles